वेस्टइंडीज : भारताने ऑस्ट्रेलिया संघाला चारी मुंड्या चीत करत दिमाखात सलग चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फेरीत प्रवेश केला आहे. भारताची १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची सुरुवात पण दिमाखात झाली आहे. दरम्यान इंग्लंडच्या १९ वर्षाखालील संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात अयशस्वी पण झाला आहे. भारताचा १९ वर्षाखालील संघातील जलदगती गोलंदाज रवी कुमार याने पहिल्याच षटकात २ बळी घ्यायची किमया केली आहे. त्याने जेकब बेथेल आणि इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्ट यांना पहिल्या काहीच चेंडूंमध्ये पायचीत आणि त्रिफळाचित केले आहे. तर राज बावा याने पण इंग्लंडचे ४ बळी घेतले आहे.
१९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारे दोन्ही संघ हे आत्ता पर्यंत अपराजित राहिले आहेत. भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर इंग्लंडने अफगाणिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. भारताने सलग चार वेळा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे तर १९ वर्षांखालील इंग्लंड संघाने सुद्धा तब्बल २४ वर्षांनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने दोघांच्यात रोमहर्षक सामना बघावयास मिळणार आहे एवढं नक्की. भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार यश धूल हा दिल्लीचा आहे , पूर्वी दिल्लीच्याच विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या नेतृत्वाखाली भारताने २००८ आणि २०१२ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ चुकतेय…”; चित्रा वाघ यांचा टोला
- किरीट सोमय्यांना शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- पुण्यात गुंडा गर्दी खपवून घेणार नाही – देवेंद्र फडणवीस
- पुण्यातील क्रीडा स्पर्धांबाबत पालकमंत्री अजित पवार यांचे महत्वाचे निर्देश…
- Shivsena VS BJP : पुण्यात शिवसैनिकांचा राडा; किरीट सोमय्यांना केली धक्काबुक्की
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

