मुंबई: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने क्वीन्सटाउनच्या जॉन डेव्हिस ओव्हल येथे सोफी डिव्हाईनच्या न्यूझीलँड विरुद्ध झालेल्या एकमेव टी २० सामना खेळला ज्यात त्याला केवळ १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत आधी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. न्यूझीलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५५ धावा केल्या. ज्यात न्यूझीलँडची सलामीवीर बेट्स हिने सर्वाधिक ३६ धावा केल्या तर भारताकडून गोलंदाजीत पूजा वस्त्रकार आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. न्यूझीलँडच्या १५५ धावांचे पाठलाग करताना भारतीय फलंदाज २० षटकात केवळ ८ बाद १३७ धावा करता आल्या आणि त्यांचा पराभव झाला. दौऱ्यात हा एकमेव टी २० सामना होता.
एकट्या टी २० च्या समाप्तीनंतर भारतीय संघाचे लक्ष एकदिवसीय मालिकेकडे असेल. भारताची पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका १२ फेब्रुवारी पासून होईल. न्यूझीलँड विरुद्ध मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय महिला संघ करेल. ज्यामुळे त्यांना ४ मार्चपासून सुरू होणार्या 2022 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी मदत मिळेल. .मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघ 2017 च्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचला होता. मात्र त्यांना इंग्लंडकडून हृदयद्रावक पराभव पत्करावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या
- “…ऑफर नाकारली म्हणून”, संजय राऊतांचे थेट उपराष्ट्रपतींना पत्र; ईडीवर केले खळबळजनक आरोप
- “राहुल गांधी देशाबद्दल बोलतात आणि नरेंद्र मोदी…”; काँग्रेसची टीका
- “त्यांनी मला व्हॅनमधून…”; विराट कोहलीला आठवला जुना किस्सा
- “…तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झोडल्याशिवाय राहणार नाही”, अनिल बोंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
- “भारतीय नेत्यांनी…”; कर्नाटकातील हिजाब वादावर मलाला युसफझाईची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

