नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील भाषण चांगलेच गाजत आहे. इंग्रज परतले परंतु तोडा आणि राज्य करा ही वृत्ती काँग्रेसला देऊन गेले. तसेच मागील ७० वर्षे काँग्रेसने विभाजनवादाचा खेळ खेळला असा टोला मोदींनी लगावला होता. यावर कॉंग्रेसच्या तीव्र स्वरूपातील प्रतिक्रिया उमटल्या.
आज पुन्हा एकदा कॉंग्रेसने फेसबुक पोस्ट करत मोदींवर टीका केली आहे. दूरदृष्टी असलेले नेते वर्तमान आणि भविष्यासाठी योजना याबद्दल बोलतील, आणि अयशस्वी नेते विरोधकांना दोष देतील. आणि निरर्थक बडबड करून तुम्हाला गुंतवून ठेवतील. असा टोला कॉंग्रेसने लगावला आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4686693578123544&id=298011526991793&sfnsn=wiwspwa
सोबतच राहुल गांधी संसदेत गरिबी, सुक्ष आणि मध्यम उद्योग, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासारख्या मुद्द्यांवर बोलतात. तर पंतप्रधान मोदी कॉंग्रेस-नेहरू, कॉंग्रेस- नेहरू फक्त कॉंग्रेस- नेहरू यावरच बोलतात, असा खोचक टोलाही कॉंग्रेसने अधिकृत फेसबुक पेजवरून लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झोडल्याशिवाय राहणार नाही”, अनिल बोंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
- “भारतीय नेत्यांनी…”; कर्नाटकातील हिजाब वादावर मलाला युसफझाईची प्रतिक्रिया
- आनंद महिंद्रा यांना सापडली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची ‘भिंत’, फोटो शेअर करत म्हणाले…
- अपक्ष उमेदवाराची ‘मोदी रसोई’ ठरतेय चर्चेचा विषय
- “…त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही”, नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य


