Share

जागतीक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारत करणार श्रीलंकेचा दौरा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना संसर्गामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर भारतीय संघ इंग्ंलंडमध्ये जागतीक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळायला सज्ज आहे. बीसीसीआयने या सामन्यासाठी नुकताच संघ जाहिर केला. या सामन्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारताला इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

मात्र यादरम्यान जुलै महिन्यात भारताचा कोणताही दौरा नाही. तेव्हा या काळात उर्वरीत आयपीएल स्पर्धा होण्याची शक्यता होती. मात्र बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ते शक्य नसल्याचे सांगत या महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असल्याचे सांगितले. श्रीलंकेच्या या दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणार असल्याची माहिती गांगुलीने दिली आहे.

हा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायला जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधिच झालेली आहे. जुन महिन्यात भारतीय संघाला जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जुन दरम्यान हा सामना भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान होणार आहे. यानंतर इंग्लंडमध्ये ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!