Share

भारत-इंग्लंड महिला कसोटी; तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजाचे वर्चस्व

Published On: 

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा एकमेव कसोटी सामना ब्रिस्टल येथे सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ३९६ धावांवर डाव घोषीत केला होता. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघ २३१ धावा करुन सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने दुसऱ्या डावात १ गडी गमावत ८३ धावांची मजल मारली आहे. भारतीय संघ अजुनही ८२ धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंड दौऱ्यातील भारतीय महिला संघाचा एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय महिला संघाने पहिल्या डावात २३१ धावांची मजल मारली. या डावात भारतीय महिला संघाची सलामीवीर शेफाली वर्माने पदार्पणातच जबरदस्त खेळी करत शानदार अर्धशतक झळकावले. १५२ चेंडुचा सामना करताना शेफालीने ९६ धावांची खेळी केली. तिचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. याखेळी दरम्यान तिने १३ चौकार आणि २ षटकार लगावले.

स्म्रिती मंधानाने तिला चांगली साथ देत शानदार ७८ धावांची खेळी साकारली. भाराताच्या दोन्ही सलामीवीरांनी १६७ धावांची धमाकेदार सलामी देत सामन्यावर पकड बनवली होती. मात्र दोन्ही सलामीवीर बाद होताच १६७ वर १ बाद वरुन संपुर्ण भारतीय संघ २३१ वर बाद झाला. यासह इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात १६५ धावांची आघाडी मिळाली. यानंतर इंग्लंडने भारतीय संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात भारताने १ गडी गमावत ८३ धावांची मजल मारली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!