मुंबई : वेस्ट विंडीज विरुद्ध एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपला १०००वा एकदिवसीय सामना दमदार शैलीत जिंकला. भारतीय संघाने विंडीजला ६ विकेट्सने पराभूत केले. तसेच ३ सामन्याच्या मालिकेत १-० आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकून जिंकत भारतीय संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या ४ विकेट्सच्या जोरावर भारतने विंडीजला १७६ धावांवरच सर्वबाद केले. विंडीजच्या १७६ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याने १० चौकार आणि १ षटकारासह ६० धावा केल्या. भारतने अवघ्या २८ ओव्हरमध्ये लक्षापर्यंत पोहचत विजय मिळवला आहे.
A sparkling performance from India in their 1⃣0⃣0⃣0⃣th ODI ????
They win the first match against West Indies by six wickets, taking a 1-0 series lead ????#INDvWI | https://t.co/Bf4Z5gkR7N pic.twitter.com/0ExjX2tdTS
— ICC (@ICC) February 6, 2022
भारतासाठी १०००वा एकदिवसीय सामना खास ठरला आहे. रोहित शर्माची कर्णधार म्हणून नवीन सुरुवात या विजयाने गोड झाली आहे. मात्र विराट कोहलीच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही. विराटला या सामन्यात केवळ ८ धाव करता आल्या. भारताचा दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “वाईन विक्रीला परवानगी देणं चुकीचं”, रक्षा खडसेंचा हल्लाबोल
- मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी मुळीच खपवून घेणार नाही- रक्षा खडसे
- संजय राऊतांची पत्रकार परिषद रद्द; ट्वीट करत म्हणाले “लवकरच मी रोखठोक बोलेन”
- “लता मंगेशकर यांच्या निधनाने गंगा-यमुनेचा प्रवाह थांबला, हिमालयही दुःखाने वितळून गेला”
- बापलेकीचं आपुलकीचं नातं… सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हाताने घातले शरद पवारांच्या पायात बूट


