Share

राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला सत्ताधारी आमदार, खासदार गुल, भाजपची टीका

Published On: 

मुंबई : सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक दुर्घटना घडल्या आहे तसेच १५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत मिळून देण्यासाठी सत्ताधारी पक्ष केंद्राकडे मागणी करत आहे. त्यासाठी राज्यपालांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत सत्ताधारी आमदार, खासदारांनीच दांडी मारली. यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कठोर टीका केली आहे.

या बैठकीला भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली. मात्र, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सुनिल प्रभु आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे या बैठकीला गेलेच नाहीत. या पार्श्वभूमीवर मदत देण्यापेक्षा केवळ राजकारण करणं हाच यांचा मुद्दा आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलीय.

दरम्यान त्यांनी असेही म्हंटले की, केंद्राकडून मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या हेतूनं ही बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीला गैरहजर राहायचं आणि दुसरीकडे राज्यपालांवर, केंद्र सरकारवर टीका करायची हा प्रकार पूरग्रस्तांच्या दु:खावर डागण्या देण्यासारखा आहे, अशी खंतही उपाध्ये यांनी व्यक्त केलीय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!