पुणे : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला भिडले आहेत. यामुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असून घर चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसताना आता खासगी रासायनिक खतांच्या किंमतीमध्येही सरासरी ६०० ते ७०० रूपये एवढी विक्रमी दरवाढ केली गेली आहे.
यामुळे या खतांच्या दरवाढीला आता विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत टीकास्त्र सोडलं आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी, खतांची दरवाढ करून केंद्राने शेतकऱ्यांना पांगळ करण्यापेक्षा आधार द्यावा, असं म्हणत केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे.
खत दरवाढ करुन शेतकऱ्याला पुरतं पांगळ करण्यापेक्षा सरकारने जर संपुर्ण देश संकटात असताना देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्याला आधार दिला, तरच देशाला कायमचा आधार मिळेल..#stopfertilizerhike
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) May 18, 2021
‘खत दरवाढ करुन शेतकऱ्याला पुरतं पांगळ करण्यापेक्षा सरकारने जर संपुर्ण देश संकटात असताना देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्याला आधार दिला, तरच देशाला कायमचा आधार मिळेल..शेतकरीविरोधी काळे कायदे आणले, कोरोना काळात आंदोलन करण्यास भाग पाडले, दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी वाटेत काटे पेरले, आणि आता खत दरवाढ करुन शेतऱ्यांचे जगणे मुश्किल केले. हिच का सरकारची पी.एम. किसान योजना ?’ असा सवाल रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारला केला आहे.
https://twitter.com/Ravikanttupkar1/status/1394655233481986050?s=20
महत्वाच्या बातम्या
- महिंद्रा तुस्सी ग्रेट हो ! कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना देणार पाच वर्षांचा पगार आणि…
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती…’
- ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली – उद्धव ठाकरे
- अनाथांना आधार : पालकांचे कोरोनाने निधन झाल्यास मोफत शिक्षण आणि महिन्याला पेन्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

