जालना: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांमध्ये नागरिकांकडून मास्कचा नियमित वापर होईल याची काळजी घ्यावी. याबरोबरच लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करत लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री टोपे बोलत होते.
बैठकी दरम्यान राजेश टोपे म्हणाले की, शासनाने ठरवून दिलेल्या निकषात जालना पहिल्या स्तरात येत असल्याने जिल्ह्यात सर्वच बाबतीत शिथिलता देण्यात आली असून नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. दरम्यान, नागरिकांनी मास्कचा वापर करणे हे अत्यंत गरजेचे असून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलिस विभागाने कारवाई करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणही तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करावी. ग्रामीण भागात लसीकरणाचे महत्त्व पटवून देत जालना जिल्हा हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये लसीकरणाच्या बाबतीत मागे राहणार नाही याची दक्षता घेऊन लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देशही मंत्री टोपे यांनी दिले.
कोरोना सोबतच वाढणार दूसरा आजार म्हणजेच म्यूकरमायकोसिस यावर बोलताना टोपे म्हणाले, या आजारावरील उपचार महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत करण्यात येत आहे. या आजारावरील उपचारासाठी रुग्णांकडून पैसे घेतले जात नाहीत ना, याची खबरदारी घेण्यात यावी. तसेच या रुग्णांना आवश्यक असलेल्या इंजेक्शन्सची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही टोपेंनी केल्या.
महत्वाच्या बातम्या
- दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे करोनामुळे निधन
- डुप्लेसीसच्या गंभीर दुखापतीनंतर पत्नीची भावुक करणारी पोस्ट
- डब्ल्युडब्ल्युईचा ‘जॉन’ निघाला ‘विराट’चा फॅन ; शेअर केला फोटो
- ‘…तर इंग्लंड बॅटिंगसाठी चांगली जागा आहे’ ; अजिंक्य रहाणेने दिल्या बॅट्समनना टिप्स
- औरंगाबादेत आता ‘या’ खड्डेमय रस्त्यांचे भाग्य उजळणार, मनपाकडून डांबरीकरणाची तयारी सुरु!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

