Share

Rajya Sabha elections : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणार; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

निवडणूकीपूर्वी काँटे की टक्कर, चूरससारखे वातावरण निर्माण करण्यात आले मात्र हे चूकीचे असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे मविआचे चारही उमेदवार विजयी होणार असे राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान आज राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. यावेळी  माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अजून मतदानाची परवानगी देण्यात आली नाही. घटनेने या दोघांना मतदानाचा अधिकार दिला आहे. तरीही त्यांना अधिकार मिळत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!