मुंबई : भारत-इंग्लंड पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर अटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱ्या डावात १ गडी गमावून ५२ धावा केल्या होत्या. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज आहे.
भारत-इंग्लंड पहिली कसोटी ही संपुर्णपणे वेगवान गोलदांजाच्या नावे राहिली. सामन्यातील आतापर्यंत वेगवान गोलंदाजानी ३० गडी बाद केले आहेत. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात ३०३ धावांची मजल मारत भारतीय संघासमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १ गडी गमावुन ५२ धावांची मजल मारली आहे.
That's Stumps on Day 4⃣ of the first #ENGvIND Test!#TeamIndia move to 5⃣2⃣/1⃣ & need 1⃣5⃣7⃣ runs more to win. @ImRo45 (12*) & @cheteshwar1 (12*) will resume the proceedings on Day 5 at Trent Bridge.
Scorecard ???? https://t.co/TrX6JMzP9A pic.twitter.com/6yBQ5gAFKO
— BCCI (@BCCI) August 7, 2021
दुसऱ्या डावात इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने कॅप्टन इंनिंग्स खेळताना १७२ चेंडुत १४ चौकारासंह १०९ धावांची शतकी खेळी केली. तर भारतीय संघाकडून या डावात पुन्हा एकदा बुमराहने सर्वाधीक ५ गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत त्याला पुरेपुर साथ दिली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दोघे प्रत्येकी १२ धावांवर खेळत होते. पहिल्या डावातील अर्धशतकवीर के एल राहुल या डावात २६ धावांवर बाद झाला. त्याने ६ चौकारासह ही खेळी साकारली.
महत्त्वाच्या बातम्या
- नीरज चोप्राच्या गोल्डन कामगिरीनंतर अक्षय कुमार आणि अजय देवगण केले अभिनंदन
- पुणे शहरात आज नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपच्या गिरीराज सिंह यांची इटालियन भाषेत पोस्ट
- बांधकाम विभागाचे कार्यालय जालन्यालाच; खंडपीठाचा हस्तक्षेपास नकार
- ‘आठ दिवसांत कोरोना काळातील बिले द्या, अन्यथा..’ आ. धस यांचा इशारा


