औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात अतिशय कमी झालेल्या लसीकरणामुळे पंतप्रधानांकडून आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात लसीकरण वाढवण्यासाठी सरपंचांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी १०० टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या २५ गावांना निधी देणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद शहर महत्त्वाचे आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लसीकरण व्हायला हवे अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे नो लस नो पेट्रोल, रेशन आदी उपक्रम राबवले जात आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन जिल्हाधिकारी जनजागृती करत आहेत.
गल्ले बोरगाव, वेरूळ, तलाववाडी, शुलीभंजन, कागजीपुरा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडल्या. लसीकरणाच्या कामात दुर्लक्ष केल्यामुळे गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन आणि सिद्धनाथ वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी निलंबनाची कारवाई केली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य
- परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- वीर दासने ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण , म्हणाला..
- ‘आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो’, मलिकांच्या फोटोला वानखेडेंचे फोटोनेच प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

