Share

परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांच्यातील वादावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

Published On: 

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी आपण भारतातच असून येत्या ४८ तासांत सीबीआयसमोर हजर होण्यास तयार असल्याचे सिंह यांनी न्यायालयात सांगितले. तद्पश्चात न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये सुरू असलेला वादावर चिंता व्यक्त केली आहे.

याप्रकरणी आम्हाला वेगळं चित्र दिसत असून देशमुख आणि सिंह यांच्यातील लढाई अधिक उत्सुकतेची बनल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. परमबीर सिंह आणि संजय पांडे यांच्यात झालेल्या संवादावर देखील सर्वोच्च न्यायालयाने टीका केली आहे. पोलिस आयुक्त अशा जबरी कारवाया करत असतील तर सामान्य माणसाचे काय होत असेल? तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे,असेही न्यायालयाने यावेळी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह कुठे आहेत हे समजल्याशिवाय खंडणी प्रकरणात अटकेपासून संरक्षण देणार नाही असे म्हटले होते. तसेच परमबीर सिंह फरार झाल्याची चर्चा होती. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली असून यावेळी परमबीर सिंह कुठे भारताबाहेर गेले नसून, ते देशातच आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आले नाहीत, असे न्यायालयात सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!