🕒 1 min read
मुंबई : देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले जात आहेत. राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. राज्याचा रिकव्हरी रेटही वाढताना दिसत आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात आज १३,७५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण ५७,३३,२१५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८९% एवढे झाले आहे.
आज राज्यात ६,२७० नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ९४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९६,६९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,७९,०५१ (१५.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत झाली ‘ही’ मोठी चूक ; १४ पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबन
- सेवेत सामावुन घ्या! प्रलंबित मागण्यांसाठी आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र : नाना पटोले
- कोरोनाचा परिणाम; फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लातूरकरांचा ‘योग दिन’
- आजपासून ३२ स्मार्ट सिटी बस रस्त्यावर, १२ मार्गांवर होणार ४४४ फेऱ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
