Share

जालना जिल्ह्यात संचारबंदी कागदावर लोकांचा संचार रस्त्यावर!

Published On: 

🕒 1 min read

जालना: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवेत बहुतांश सेवांचा समावेश करून गुरूवारपासून संचारबंदीचे आदेश जारी केले, या आदेशाच्या दुसऱ्यादिवशी बाजारपेठ कडकडीत बंद होती, परंतू अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोकांचा मुक्तसंचार सुरू होता. पोलिसांचा जागोजागी खडा पहारा होता, परंतू अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बहुतांश सेवांना परवानगी दिल्याने बाजारात फक्त दुकाने बंद होती, मात्र रस्त्यांवरील वर्दळ कायम असल्याने पोलिसांना फारसे काही करता आले नाही.

कडक संचारबंदीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गुरूवारी शहरात फेरफटका मारला असता जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला. सराफा, नेहरूरोड, फुलबाजार, सुभाष रोड, बस स्थानक, शिवाजी पुतळा, मामाचौक, महावीर चौक, वीर सावरकर, चौक, टांगा स्टॅण्ड आदी भागांसह जुना जालन्यातील शनिमंदिर, गांधीचमन, मस्तगड, रेल्वे स्टेशन, नुतनवसाहत, कचेरी रोड, बाजार गल्ली आदी भागांमध्ये दुकाने बंद होती.

कोरोनाचा विळखा दिवसे न दिवस घट्ट होत असताना शासनाने लागू केलेली संचारबंदी आदेश कागदावर जरी असला तरी लोकांचा रस्त्यावर मुक्तसंचार सर्रास सुरू होता. अशा प्रकारे वर्दळीच्या संचारबंदीचा अनुभव पहिल्यांदाच येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. लोकांचा मुक्तसंचार सुरू होता. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक शहरात बिनधास्त शहरात फिरत होते. अत्यावश्यक सेवांना परवानगी असल्याने पोलिसांचाही नाईलाज झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!