औरंगाबाद : सातत्याने वाढत्या महागाईच्या भस्मासुराने सर्वसामान्य जनतेमध्ये संताप निर्माण झाला असून मोदी सरकारने २०१४ साली महागाई विषयी केलेल्या घोषणा हवेतच विरल्या असून सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तुशिवाय बँकींग, बांधकाम वस्तु, शेतीसाठीची रासायनिक खते बि-बीयाणे सर्वच बाबींच्या दरवाढीने त्रस्त जनतेचा संताप शिवसेना रस्त्यावर उतरून व्यक्त करणार आहे. शनिवारी (दि. १३) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्शवभूमीवर शहरातही मोर्चा काढला जाणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.
या मोर्चात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार मनिषा कायंदे, आमदार प्रदिप जैस्वाल, संजय शिरसाठ, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपुत, नंदकुमार घोडेले यांचीही प्रमुख उपस्थिती राहील. मोर्चाची क्रांती चौक येथुन सुरुवात होऊन गुलमंडी येथे सभेने समारोप होईल. त्याआधी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागात जि.प, पंचीयत समिती गट गणनिहाय महागाई विरोधात स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार आहे.
गुरुवारी महिला आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी एक अभिनव आंदोलन करण्यात येईल. त्या अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनाला निवेदने देऊन पेट्रोलपंप, गॅस एजन्सीला संरक्षणाची मागणी करण्यात येईल. या महागाई विरोधी एल्गारामध्ये सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेना इतर अंगीकृत संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन सहसंपर्क प्रमुख त्रिंबक तुपे, उपजिल्हाप्रमुख बाबसाहेब जगताप, राजु राठोड यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतच्या गाडीला गंभीर अपघात
- प्रकृती बिघडल्याने रामराजे नाईक निंबाळकर रुग्णालयात दाखल
- अंडरवर्ल्ड संबंधाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मलिकांनी केला गोपीनाथ मुंडे आणि दाऊदचा नामोल्लेख, म्हणाले..
- उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार- नवाब मलिक
- ‘हे तर ब्रम्हांडातल्या बेस्ट मुख्यमंत्र्यांचे हे प्रगती पुस्तक’, भाजपची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

