नवी-दिल्ली : इस्लामाबादमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अफगाणिस्तान आंतर-मंत्रालय समन्वय कक्षाच्या (AICC) पहिल्या सर्वोच्च समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांनी भूषवले. यावेळी इम्रान यांनी त्यांचे सरकार भारताला ५०,००० मेट्रिक टन गहू शेजारच्या अफगाणिस्तानला त्यांच्या हद्दीतून पाठवण्याची परवानगी देईल, अशी घोषणा केली.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान केवळ अफगाणिस्तानला भारतात माल निर्यात करण्यास परवानगी देत आहे. परंतु, सीमा ओलांडून इतर कोणत्याही दुतर्फा व्यापारास परवानगी देणार नाही. मागील महिन्यात, भारताने अफगाणिस्तानसाठी मानवतावादी मदत म्हणून ५०,००० मेट्रिक टन गहू देण्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानला वाघा सीमेवरून अन्नधान्य पाठवण्याची विनंती केली.
दरम्यान, अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनीही इम्रान यांना पाकिस्तानमार्गे गहू वाहतूक करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती आणि सुचवले होते की तालिबान सरकार भारताकडून मानवतावादी मदत स्वीकारण्यास तयार आहे. अफगाण लोकांच्या मानवतावादी गरजांमध्ये भारताने योगदान दिले आहे. यामध्ये गेल्या दशकभरात अफगाणिस्तानला १ दशलक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त गहू पुरवणे समाविष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे- नारायण राणे
- ‘राज्य सरकार पाडण्यासाठी धक्के देत राहणार’, नारायण राणेंचा इशारा
- पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा जास्त काम केलं – जेपी नड्डा
- ‘जोपर्यंत संसदेत ठराव करून हे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत…’, राऊतांचा इशारा
- …याचे राज्यकर्त्यांनी दररोज सिंहावलोकन करायला हवे- एन. व्ही. रमण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

