Share

शरद पवार हे कधीच तोडगा काढणार नाहीत, खेळवत ठेवणं हे त्यांचं काम आहे- नारायण राणे

Published On: 

मुंबई : ऐन दिवाळ सणाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरणाची मागणी करत आझाद मैदानावर राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरु केले होते. याच पार्श्वभूमीवर काल(२२ नोव्हें.) परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. तब्बल ४- साडे ४ तास चाललेल्या बैठकीतून राज्य सरकारने कोणताही मार्ग काढला नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीयमंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी शरद पवारांवर निशाणा साधता टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. माध्यमांशी संवाद साधतांना राणे म्हणाले की,’शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम आहे. कधीच काढणार नाहीत. ते निर्देश देऊ शकत नाहीत का? ज्यांनी सरकार बनवलं ते सांगू शकत नाहीत का की कर्मचाऱ्यांना ताबडतोब न्याय द्या.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’केंद्र सरकारने थेट महाराष्ट्र सरकाला निर्देश द्यावेत की हा प्रश्न त्वरीत मिटवा किंवा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ. जो मार्ग अवलंबवायचा त्याबद्दल मी स्वत: पंतप्रधान मोदींशी, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल आणि यातून मार्ग लवकरच काढावा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना यातून वाचवावं एवढं मी सांगेन. तसेच राज्यामध्ये जे कोण परिवहनमंत्री आहेत, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्याशी देखील बोलेन’, असेही राणे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!