नवी दिल्ली: मोबाईल धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. TRAI च्या नियमांनुसार आता मोबाईल धारकांचे सीम कार्ड डिअ;ॅक्टिवेट होऊ शकते. अनेक मोबाईल धारक दोन मोबाईल नंबर वापरत असतात. त्यामुळे एकच नंबर वापरात असतो. तर दुसऱ्या नंबरची सेवा न वापरल्या मुळे बंद असते. असे नंबर कायम साठी बंद करणार असल्याचे TRAI ने सांगितले आहे.
TRAI च्या या नियमांनुसार, प्रीपेड मोबाईल युजरला आपल्या सिममधून कमीत-कमी 20 रुपयांचा बॅलेन्स मेन्टेन करावा लागेल. असं न केल्यास, सिम ऑपरेटर कंपनी नंबर डिअ;ॅक्टिवेट करू शकते. त्याशिवाय, सलग 90 दिवसांपर्यंत आपल्या सिम कार्डमधून कोणताही कॉल, एसएमएस, व्हॉईस-व्हिडीओ कॉल किंवा डेटाचा वापर न केल्यासही सिम डिअ;ॅक्टिवेट होऊ शकतं. TRAI ने हा नियम 2013 मध्ये बनवला होता.
सध्या या नियमांतर्गत अनेक नंबर डिअ;ॅक्टिवेट होत आहेत. अधिकतर लोकांनी दोन नंबर उपयोगासाठी ठेवलेले असतात, पण त्यापैकी एकाच नंबरचा अधिक वापर होता आणि दुसरा नंबर वापर नसल्याने डिअ;ॅक्टिवेट होतो. अशाप्रकारे डिअ;ॅक्टिवेट झालेला नंबर पुन्हा रिअ;ॅक्टिवेट करता येऊ शकतो.
डिअ;ॅक्टिवेटनंतर 15 दिवसांचा ग्रेस पीरियड देण्यात येणार आहे. सिम डिअ;ॅक्टिवेट झाल्यास, ते 15 दिवसांच्या आत पुन्हा रिअ;ॅक्टिवेट करू शकता. त्यासाठी 20 रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर सिम पुन्हा रि;ॅक्टिवेट होईल.
BSNL चं सिम कार्ड डिअ;ॅक्टिवेट झाल्यास, सर्वात आधी BSNL कस्टमर केयरद्वारे रिअ;ॅक्टिवेट करण्याची रिक्वेस्ट पाठवावी लागेल, किंवा BSNL स्टोरमध्ये जाऊन रिअ;ॅक्टिवेशन रिक्वेस्ट सबमिट करू शकता. त्यासोबत फोटो आयडी प्रुफ द्यावा लागेल. त्यानंतर एक कन्फर्मेशन कॉल येईल आणि नंबर रिअ;ॅक्टिवेट होईल.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- नव्या कृषी कायद्यांबाबत बिहारमध्ये कोणतीही अडचण नाही : नितीशकुमार
- नेहा कक्करच्या बेबी बंप फोटोचे काय आहे सत्य? वाचा
- ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

