Share

‘तामिळनाडूप्रमाणेच मराठा आरक्षणासाठी केंद्राने हायकोर्टात शपथपत्र द्यावे’

Published On: 

उस्मानाबाद : केंद्र सरकारने तामिळनाडू सरकारचे आरक्षण कायम राहण्यासाठी सुप्रीम कोर्टास शपथपत्र दिले आहे. तसेच शपथपत्र मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी देण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या शून्य प्रहरात केली.

खासदार ओमराजे यांनी म्हटले की, मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड त्याग केला. अनेकांनी आयुष्याची होळी करुन बलिदान दिले. अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केल्या. अनेक समित्यांच्या व मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या अभ्यासानंतर २०१८ साली महाराष्ट्र शासनाने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले होते. सदरील आरक्षणावर आलेली आव्हाने, याचिका व आक्षेपांना फेटाळून गायकवाड समितीच्या अहवालानुसार उच्च न्यायालयाने देखील मराठा आरक्षण मान्य केले.

परंतु सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज बांधवावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. तमिळनाडू राज्यातील आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी ज्याप्रमाणे केंद्र सरकारने शपथपत्र देऊन आरक्षणाचा गंभीर प्रश्न सोडवला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील केंद्र सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे आरक्षणाबाबतचे शपथपत्र द्यावे व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!