Share

आम्ही अधिवेशन घेऊनही पळपुटे मग मोदींना काय म्हणाल?; उदय सामंतांची भाजपवर टीका

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग:- दिवाळीनंतर देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विरोधी पक्ष भाजपने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसात अधिवेशन संपवल्याने ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिलंय. महाराष्ट्रात आम्ही 2 दिवस अधिवेशन घेऊनही आम्हाला पळपुटे म्हणता, मग अधिवेशनच न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणाल? असा सवाल उदय सामंत यांनी केलाय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काय रणनीती असेल हे सांगणार नाही. मात्र, तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे, असंही सामंत यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, संसदीय संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोव्हिड साथीच्या काळात जगातील 105 हून अधिक देशांवर ऑनलाईन, शारीरिक अंतर ठेवून आणि इतर नियमांना अधीन राहून अधिवेशन झाली आहेत. भारतीय संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करून मोदी सरकार आपल्या जबाबदा-यांपासून का पळत आहे ? असा सवाल काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!