Share

‘अजून २५ आमदार असते तर उद्धव ठाकरे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते’

Published On: 

मुंबई : आज शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. यावर देखील त्यांनी प्रत्युत्तर देताना लवकरच शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील असं भाकीत वर्तवलं आहे.

देशातील कोणत्याही गोष्टींवर टीका करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. भाजपचे काही लोक त्यात आघाडीवर असतात, अशा लोकांना भारतरत्न पुरस्कारच दिला पाहिजे अशी कोपरखळी त्यांनी मारली. एवढंच नाही तर, आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. ‘शिवसेनेकडे सध्या 56 आमदार असल्यामुळे उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार, 25 अजून असते तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असते…’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, ‘नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या जाण्याने शिवसेनेचे नुकसान झाले का, असा प्रश्न पत्रकार प्रतिनिधींनी राऊतांना केला असता त्यांनी क्षणार्धातच, ‘बाळासाहेब सानप यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता. त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच नाही,’ असं प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!