Share

नितेश राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी रोजी होणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच या विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेतून कुणी केलेली नाही तर ही मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नितेश राणे यांनी आधी ट्वीटद्वारे आणि नंतर प्रत्यक्ष माध्यमांशी बोलतानाही या मागणीचा पुनरूच्चार केला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे लोक नाव घेतात त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तरी आहे का? याचा स्वत: विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी नितेश राणे यांना लगावला आहे.

दरम्यान, ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला. त्यांनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. तसेच बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार गद्दारांना नाही अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!