मुंबई : मागील काही दिवसांपासून सीबीआय, ईडी, एनसीबी अश्या केंद्रीय यंत्रणांवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’तुकाराम सुपे, वाझे, परमबीर, अमिताभ गुप्ता, सीताराम कुंटे असे अनेक अधिकारी सर्रास घोटाळे / वसुली करताय. पण बदनामी होते ती CBI, ED, NCB च्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची जे महाराष्ट्रात गुन्हेगारी थांबवण्याचा प्रयत्न करताय’, असे खोत म्हणाले.
तुकाराम सुपे, वाझे, परमबीर, अमिताभ गुप्ता, सीताराम कुंटे असे अनेक अधिकारी सर्रास घोटाळे / वसुली करताय.
पण बदनामी होते ती CBI, ED, NCB च्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची जे महाराष्ट्रात गुन्हेगारी थांबवण्याचा प्रयत्न करताय
इतका भ्रष्टाचार माजवला तर तपास यंत्रणा तुमची कॉलर पकडणारच !!!
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) December 18, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’इतका भ्रष्टाचार माजवला तर तपास यंत्रणा तुमची कॉलर पकडणारच.’
महत्वाच्या बातम्या
- देसाईंना मंत्रिपद दिल्याचं वाईट वाटलं; रामदास कदमांची खदखद
- ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना छोटी गोष्ट’; ‘या’ मुख्यमंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
- भातखळकरांच्या ‘त्या’ टीकेवर सचिन सावंत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘इंग्रजांचे पाय…’
- सहकारातील अडचणी दूर करण्यासाठी अमित शहांचा महाराष्ट्र दौरा- देवेंद्र फडणवीस
- …हे नाकर्ते खंडणी सरकार अजून किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?- अतुल भातखळकर


