🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.
आयपीएल स्पर्धेत २९ सामने झाले आहेत, तर ३१ सामने खेळायचे बाकी आहेत. उर्वरीत आयपीएल सामन्यासाठी भारताला अनेक देशातुन निमंत्रण आले आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये. यादरम्यान जर उर्वरीत आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर तब्बल २००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने सांगितले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गांगुलीने हा खुलासा केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे आगामी क्रिकेटचे वेळापत्रक हे व्यस्त आहे. टी-२० विश्वचषकापुर्वी हा हंगाम पुर्ण होऊ शकतो. मात्र अजुनही याबाबत कोणाताही अंतिम निर्णय झालेला नाहीये. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत शंका उपस्थीत केली जात आहे. भारतातील कोरोना स्थितीवर टी-२० विश्वचषकाच्या आयसीसीची नजर आहे. जर भारतात परिस्थीती सुधारली नाही तर विश्वचषक हा युएईमध्ये खेळवण्याचा विचार सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुमच्या आयुष्यातील प्रेमळ व्यक्तींना घट्ट धरुन ठेवा’ आईनंतर बहिणीला कोरोनामुळे गमानवल्यानंतर महिला क्रिकेटपटुचे ट्विट
- ‘कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार’
- एसटीच्या कर्मचाऱ्यांना लस उपलब्ध करून द्यावी, अनिल परबांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- मी ९६ कुळी मराठा ; कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही : शशिकांत शिंदे
- रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार प्रकरण!, सहा जणांना जामीन मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
