Share

‘मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी?’

Published On: 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सोलापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चासाठी मंगळवेढ्यातुन सोलापूरला जात असलेल्या आ. समाधान आवताडे यांच्याबरोबर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आंदोलकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांना पोलिसांनी अडविले. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर – पुणे महामार्ग रोखला. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही दडपशाही कशासाठी अशी विचारणा केली आहे.

‘काल वारकऱ्यावर कारवाई. आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडीसरकारच आरक्षण अपयश लोक कस विसरतील?’ असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

दरम्यान, सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली. आक्रोश मोर्चाच्या आयोजकाचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. संचारबंदी झुगारुन सोलापुरातील अनेक आंदोलक मोर्चात सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!