🕒 1 min read
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्राकडे बोट केलं असून विरोधी नेते मात्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.
आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘खंडण्या गोळा करायला जशी सरकारी यंत्रणा कामाला लावली… तशीच औषधं..ऑक्सिजन..बेडसाठी कामाला लावली असती तर आज महाराष्ट्राचे असे हाल झाले नसते.’ असा प्रहार शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
खंडण्या गोळा करायला जशी सरकारी यंत्रणा कामाला लावली…
तशीच औषधं..ऑक्सीजन..बेडसाठी कामाला लावली असती तर आज महाराष्ट्राचे असे हाल झाले नसते.— Shalini Thackeray (@ThakareShalini) April 14, 2021
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी खंडणी वसुलीचा गंभीर आरोप केल्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी नेमली आहे. यामुळे देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला असून १४ एप्रिल रोजी सीबीआयने त्यांची तब्बल ९ तास कसून चौकशी केली आहे.
- महाराष्ट्र ठरणार लस निर्मिती करणार पहिलं राज्य; हाफकिन संस्थेला केंद्राकडून परवानगी
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील


