Share

ठरलं तर मग! यंदाचा टी-20 विश्वचषक युएईमध्येच

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतात होणार आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर अखेर बीसीसीआयने अंतिम निर्णय घेतला आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार भारतात आयोजीत होणारा हा टी-20 विश्वचषक युएईमध्ये खेळविण्यात येणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली आहे.

आयपीएल 2021 स्पर्धेत कोरोनाच्या शिरकावामुळे अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. यानंतर भारतात आयोजीत टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर प्रशनचिन्ह उपस्थित झाले होते. 1 जुन रोजी पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने टी-20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी 1 महिन्याचा अवधी मागितला होता. तो अवधी संपायला काही दिवस शिल्लक असताना सौरव गांगुलीने याबाबत निर्णय दिला आहे. आयसीसीच्या आगामी बैठकीत याबाबत हा निर्णय कळविण्यात येणार आहे.

मात्र या विश्वचषकाच्या वेळापत्रकाबद्दल अद्यापही कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक आणि टी-20 स्पर्धेचे वेळापत्रक यांची योग्य नियोजन करणे बीसीसीआयसमोर एक अव्हान आहे. काही दिवसापुर्वी समोर आलेल्या माहिती नुसार टी-20 विश्वचषक स्पर्धा ही 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या दरम्यान खेळवीण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आली होती. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळु शकला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!