Share

‘ती’ बैलगाडी शर्यत नाही तर, जनभावनांचा उद्रेक होता, भाजपचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

सांगली: आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारच्या आणि पोलिसांच्या मोठ्या विरोधानंतरही अखेर बैलगाडी शर्यत यशस्वी करून दाखवली. कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही असा शासनाचा प्रयत्न होता तर काहीही झालं तरी शर्यत पार पडणारच, असा निर्धार पडळकरानी घेतला होता. त्याप्रमाणेच आज सकाळी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन बैलगाडा शर्यत यशस्वी करून दाखवली. यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

अखेर पडळकर यांची बैलगाडी शर्यत राज्य सरकार आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून गनिमी काव्याने पार पडली. ग्रामीण महाराष्ट्राच्या जनभावनेचा अंदाजच महा विकास आघाडी सरकारला आलेला नाही. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेली ती बैलगाडी शर्यत नव्हती, तर जनभावनांचा उद्रेक होता. अशा शब्दांत भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

 

दरम्यान पडळकर यांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवत बैलगाडा शर्यत पार करून दाखवली. आटपाडी तालुक्यातील निंबवडे-वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर सकाळी शर्यती पार पडल्या. न्यायालयाने बंदी घातली असतानाही पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार केल्या आहेत. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असूनही शर्यती पार पडल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!