🕒 1 min read
पुणे : राज्यपाल नामनिर्देशित १२ जागात ‘ महाविकास आघाडी’तला घटक पक्ष कॉंग्रेस पक्षाकडून चार लोकांना विधान परिषदेवर पाठवले जाणार आहे.’या चार जागांमध्ये जर पुणे शहराला प्रतिनिधित्व मिळणार असेल तर माझा जरूर विचार होईल’, असा विश्वास कॉंग्रेस निष्टावंत गोपाळ तिवारी यांनी ‘महाराष्ट्र देशा’ सोबत बोलतांना व्यक्त केला.
मी गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी पुण्यात काम करतोय.भाजपाचा गड समजल्या जाणऱ्या ठिकाणावरून मी नगरसेवक म्हणून निवडून आलो.पुण्यातल्या कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी मी अनेक वर्षापासुन प्रयत्न करतोय. त्यामुळे जर पुण्याला प्रतिनिधित्व द्यायचा विचार असेल तर निश्चितच माझ्या नावाचा विचार व्हावा, असे तिवारींनी पुढे म्हटले आहे.पण शेवटी सर्वस्वी निर्णय पक्षाचा राहील आणि जो काही निर्णय येईल तो मला मान्य राहील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली
विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत.या चार जागांमध्ये कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तरी मुजफ्फर हुसैन, रजनी पाटील, सचिन सावंत आणि अनिरुद्ध वनकर ही नावे कॉंग्रेसकडून निश्चित झाल्याचे बोलले जाते आहे.पण कॉंग्रेसकडून अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- अनिल गोटे यांनी पाडले भाजपला खिंडार,धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…
- जान सानू प्रकरण: चौफेर टीकेनंतर अखेर ‘कलर्स’ने मागितली महाराष्ट्राची माफी
- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- जनतेचा सेवक असल्याने जागा हडप करणाऱ्यांना माफ करणार नाही- लहू कानडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

