नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या जन्मदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. तर काँग्रेसने मोदींवर टीकास्त्र सोडत ‘बेरोजगारी दिवस’ साजरा केला’ एकीकडे भाजप नेत्यांनी मोदी सरकारच्या चांगल्या कामांचा तर दुसरीकडे काँग्रेससह विरोधकांनी मोदी सरकारमुळे जनतेवर झालेल्या विपरीत परिणामांचा पाढाच वाचून दाखवला.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करून मोदींना लक्ष्य केलं आहे. ‘फक्त मित्रांसाठी नाही तर जनतेसाठी भाजपने काम केलं असतं तर बेरोजगारी दिवस साजरा करण्याची वेळ आली नसती,’ अशी टिपण्णी राहुल गांधी यांनी केली आहे.
देशातील युवकांना दरवर्षी २ कोटी नवीन रोजगार देण्याचे खोटे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले. हे अश्वासन त्यांनी पाळले नाही उलट अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून काँग्रेसतर्फे साजरा करण्यात आला. ट्विटरवर देखील आज या हॅशटॅगची चांगलीच चर्चा रंगली होती.
#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस की ज़रूरत ही नहीं पड़ती अगर भाजपा जनता के लिए काम करती- मित्रों के लिए नहीं!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 17, 2021
बेरोजगारी उच्चांकावर – बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘दरवर्षी २ कोटी नविन रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षाच्या सत्ताकाळात नविन रोजगार मिळणे तर दूरच आहे. अनेकांचे रोजगार जात आहेत. मोदी सरकारच्या गलथानपणामुळे बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.’ अशी टीका थोरात यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ज्यांना कुणाला आमच्यासोबत यायचंय त्यांनी खुशाल यावे आणि भावी व्हावे-संजय राऊत
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- तेजस्विनीच्या पदरावरील ‘यदा यदा ही ..’ या श्लोकावर खिळल्या नजरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

