मुंबई : राज्यात कोरोना आटोक्यात यावा यासाठी प्रत्येकाने सावधपणे पाऊल टाकणे गरजेचे असून, सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच येणाऱ्या सणांविषयी बोलतांना ते म्हणाले की ,’नवीन नियमांचे उल्लंघन होणार नाही, तसेच कोविड योद्धा होता आलं नाही तरी, कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
यासंदर्भात अधिक बोलत ते म्हणाले की, ‘फक्त अर्थचक्र सुरळीत व्हावे, यासाठी आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, पण नियमांचा भंग करत, राजकीय, सामाजिक, धार्मिक तसेच इतर कार्यक्रम आयोजित करून सर्वसामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल, अशी काही जणांची वर्तणूक पाहता, चिंता वाटत असल्याचे ठाकरे म्हणाले.नागरिकांनी कुणाच्याही आमिषाला किंवा चिथावणीला बळी न पडता स्वतःचा सोबतच इतरांच्या आरोग्याचा विचार करावा, आणि गर्दी करणे टाळावे.’
दरम्यान, राज्यामध्ये वैद्यकीय प्राणवायूचे मर्यादित उत्पादन लक्षात घेता, एक जबाबदार नागरिक म्हणून आमच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे, असे देखील ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पनवेलमध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहिम, सुरक्षा रक्षक आणि मोलकरणीचेही होणार लसीकरण
- ममतांना हायकोर्टाचा धक्का! बंगाल हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार
- पिंपरी चिंचवड : भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष ACB च्या जाळ्यात
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

