🕒 1 min read
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काल(२३ जाने.)९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तद्पश्चात शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत ठाकरेंच्या वक्तव्यांचे समर्थन केले आहे.
यावेळी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,’भाजपला आम्ही महाराष्ट्रामध्ये जमीनीवरुन आकाशापर्यंत पोहचवले आहे. आम्ही युतीचा धर्म कायम पाळला असून इतिहास याला साक्ष आहे.’ तसेच ही केवळ शिवसेनेची गोष्ट नसून जे चांगल्या हेतूने भाजपसोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागलीय, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’बाबरीनंतर शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरेंची उत्तर भारतामध्ये एक लाट होती. त्यावेळी आम्ही उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब अगदी जम्मू काश्मीरपर्यंत निवडणूक लढलो असतो तर काल जसं उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे देशात आमचा पंतप्रधान असता. परंतु आम्ही हे सारं भाजपासाठी सोडलं,’ असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
-
“मविआ सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो”, भातखळकरांचे टीकास्त्र
-
राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा-नाना पटोले
-
“देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत, ‘त्या’ घटनेवरून नाना पटोले संतापले
-
“लवकरच मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसणार”, विरोधकांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
