Share

राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा-नाना पटोले

Published On: 

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले, पहाटेची सत्ता गेल्यामुळे भाजप पाण्यातील माशासारखा तडफडत आहे. राज्यातील सत्ता बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सत्ता बरखास्त करा, असा टोला नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

यावेळी नाना पटोले म्हणाले, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अडचणीत आला आहे. त्यावर भाजप का बोलत नाही? गुंडाची चर्चा त्या प्रवृत्तीचे लोक करतात. त्यावर मी बोलणार नाही. समोरचा व्यक्ती सांगतोय मग हे गुंड आहे का? असं सांगतानाच गुंडाला प्रेमाची भाषा कळत नाही. त्यामुळे गुंडाला मारणार असं मी म्हणालो. याचा अर्थ जीवे मारणार असा होत नाही. मूळ विषयाला बगल देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मी ज्या गावगुंडाबाबत बोललो होतो. तो सर्वांसमोर आला आहे. आता या विषयावर मी बोलणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

पुढे नाना पटोले म्हणाले, लोक भाजपला हसतात. त्याची बायको पळते, त्याच नाव मोदी ठेवलं जातं. बाकी काही राहिलं नाही आता. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांची लोकं आहोत. आमच्या मनात असे विचार येत नाहीत. त्यांच्याच मनात विचार येतात, असा टोलाही नाना पटोलेंनी भाजपला लगावला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!