🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
उद्या म्हणजेच डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आजच्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
या बंदमध्ये राज्यात काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. राज्यातील काँग्रेसचे अनेक मंत्री देखील या आंदोलनात सामील झाले होते. आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी मोदी सरकारसह भाजपवर खोचक टीका केली आहे. ‘शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षित लोकं रस्त्यावर आले असते तर ना विमानतळे विकली गेली असती, ना रेल्वे स्टेशन, ना LIC, ना BPCL विकली जाती, ना बेरोजगारी वाढली असती, ना जीडीपी घसरला असता’ अशी चारोळी टाकत त्यांनी भाजप सरकार आल्यानंतरच्या परिस्थितीवरून घणाघात केला आहे.
काश किसानों की तरह पढ़े लिखे लोग भी सड़को पर आ जाते,
न एयरपोर्ट बिकता, न रेलवे स्टेशन, न LIC, BPCL बिकती, न नौकरी जाती, न बेरोजगारी बढ़ती, न जीडीपी गिरती
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) December 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- दिल्ली-महाराष्ट्राच्या लढाईत माझा तानाजी झालायं : प्रताप सरनाईक
- शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, राहुल गांधींसह पाच प्रतिनिधी घेणार राष्ट्रपतींची भेट!
- टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा व्हाईटवॉश हुकला; भारताचा पराभव
- गेले दोन आठवडे ईडीला हुलकावणी देणारे सरनाईक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला!
- दिलदार शेतकऱ्यांचा मोठेपणा; आंदोलनात करून दिली रुग्णवाहिकेला वाट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
