Share

“कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर…”, गृहमंत्र्यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. परंतु, या सभेला प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नसल्याने संभ्रम कायम आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी भाष्य केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशारा देखील गृहमंत्र्यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना वळसे पाटील म्हणाले की,‘राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात एक दोन दिवसांत औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही.’ तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबाद शहरात २६ एप्रिल ते ९ मे या काळात पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत, अशा आशयाची माहिती सकाळपासूनच समाजमाध्यमातून फिरत होती. परंतु, शहरामध्ये जमावबंदीच्या आदेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे आदेश काढण्यात आलेले नाही, असा खुलासा औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!