Share

….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखले. न्युझीलंडने त्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद अशी होती.

या सामन्याच्या दरम्यान आयसीसीशी बोलताना आर आश्विनने निवृत्तीबद्दल मोठे भाष्य केले आहे. यावेळी तो म्हणाला,’कसोटी क्रिकेटमध्ये कायम सर्वोकृष्ट योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी मी कधीही तडजोड केली नाही. सर्वोत्कृष्ट देण्याच्या या प्रयत्नामुळेच मी येथे पोहोचलो आहे. ज्या दिवशी मला वाटेल की मी सर्वोत्कृष्ट देऊ शकत नाही. त्यादिवशी मी क्रिकेट खेळण सोडुन देईन’ असे वक्तव्य केले आहे.

३४ वर्षिय आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०९ गडी बाद केले आहे. आश्विन सध्या न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत आहे. काही दिवसापुर्वी संजय मांजरेकरने त्याला सर्वकालीन महान क्रिकेटपटु मानन्यापासुन नकार दिल्याने ट्विटरवर वाद उत्पन्न झाला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!