Share

‘आजारी माणसाला गोळी दिली पण अर्धीच, तो बरा कसा होणार?’ ; शिवसेनेचा सवाल

Published On: 

नवी दिल्ली : संसदेत काल १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. यामुळे राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.

याच मुद्द्याला धरून आत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी देखील हल्लाबोल केला आहे. ‘हे विधेयक म्हणजे आजारी माणसासारखं आहे. सरकारने आजारी माणसाला गोळी दिली. पण ती अर्धीच दिली. मग तो बरा कसा होणार?’ अशा शब्दांत त्यांनी मोडी सरकारला टोला लगावला आहे. गजानन किर्तीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही कुणाला किती टक्के आरक्षण द्यावं याची मागणी केली नाही. आरक्षणाची जी मर्यादा आहे. त्यामुळे आरक्षण देण्यात अडचणी येत आहेत.

त्यामुळे ही मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. शिवसेना दुटप्पी नाही. भाजपने मराठा आणि ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या विधेयकातून केलं आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा निषेध करतो,’ असे देखील किर्तीकर यांनी यावेळी जाहीर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!