मुंबई : मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीतील भोपर तसेच सागाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांसह तब्बल ३१ जणांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत २१ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर अभिनेता आरोह वेलणकरने याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय चाललय राज्यात ह्याचा थांगपत्ता नाही मविआ सरकारला!! @OfficeofUT @PawarSpeaks @AUThackeray @AjitPawarSpeaks https://t.co/0aKoyMV92G
— Aroh Welankar (@ArohWelankar) September 23, 2021
आरोहने याप्रकरणी ट्विट करत या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे. यात त्याने म्हंटले की, ‘काय चाललय राज्यात ह्याचा थांगपत्ता नाही मविआ सरकारला!!’ असे म्हणत त्याने मविआ सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, यावर भाजपने देखील सरकारला घेरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या विविध नेत्यांकडून कालपासून सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राहत्या घरी कोंडल, प्रवासात आडकाठी आणली; सोमय्या करणार उद्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रार
- ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले- छगन भुजबळ
- आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- लातूरमध्ये क्रीडा केंद्र उभारा, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

