मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने कोलकाता नाइट रायडर्सचा ७ गडी राखुन दणदणीत विजय मिळवला. केकेआरने दिलेले १५५ धावांचे लक्ष्य दिल्लीच्या संघाने ३ गडी गमावत १७व्या षटकात सहज पार केले. धडाकेबाज अर्धशतकासाठी पृथ्वी शॉला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा एकटाच केकेआरवर भारी पडला.
या सामन्यात पृथ्वी शॉने पहिल्याच षटकात सलग ६ चौकार मारत केकेआरच्या गोलंदाजीची हवा काढुन घेतली. १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने संघाला शतकी सलामी दिली होती. शिखर धवन ४६ धावा करत बाद झाला तर, पृथ्वी शॉने अवघ्या ४१ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. यात त्याने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. पृथ्वीच्या या खेळी नंतर माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याचे कौतुक केले आहे.
‘एका ओव्हरमध्ये सहा फोर मारायचे असतील कर तुम्हाला परफेक्ट गॅप काढावा लागतो. फिल्डर जाळ्यातून बॉलला सीमापार धाडावं लागतं. जे काम अजिबातच सोपं नसतं. माझ्या कारकीर्दीत मी नेहमीच असा कारनामा करण्याचा प्रयत्न केला पण एका ओव्हरमध्ये मी 18 ते 20 धावांपेक्षा अधिक धावा करु शकलो नाही, असं वीरेंद्र सेहवाग पृथ्वीच्या खेळीवर बोलताना म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवभोजन थाळीने पार केला ४ कोटींचा टप्पा
- आरसीबीच्या प्रमुख शिलेदारांना बाद करत हरप्रित ब्रारने रचला ‘हा’ विक्रम
- ‘कोरोनाच्या संकटात सरकार मदत करू शकत नाही,मला आमदार असण्याची लाज वाटतेय’
- लता मंगेशकर यांचे एक पाऊल पुढे ; मुख्यमंत्री सहायता निधीला केली 7 लाखांची मदत
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अचानक शीसगंज साहेब गुरुद्वाराला भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
