🕒 1 min read
कैरो : इजिप्तमधील सुएझ कालव्यात एक महाकाय जहाज अडकल्याने युरोप आणि आशियातील व्यापार ठप्प झालाय. या मार्गावरील समुद्री वाहतूक करणारे शेकडो जहाजांची रांगच लागलीय. यामुळे दररोज ७५०० कोटी रुपयांच्या व्यापाराचं नुकसान होतंय. याचा थेट परिणाम भारतावरही होण्यास सुरुवात झालीय.
त्यामुळेच भारतानेही यावर ४ सुत्री उपाययोजना केली आहे. व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने आपल्या अधिकृत वक्तव्यांत म्हटलं, “सुएझ कालव्यातील अडथळ्यांमुळे जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम होत आहे.” या बैठकीचं नेतृत्व विशेष सचिव पवन अग्रवाल यांनी केलं. त्यांच्यासोबत बैठकीत पोर्ट , शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय, ADG शिपिंग, कंटेनर शिपिंग लायसन्स असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनही सहभागी होती.
सुएझ कालवा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडतो. हा कालवा १९३.३ किलोमीटर लांबीचा आहे. त्याचे बांधकाम १८६९ मध्ये झाले. सुएझ कालव्याचं एक टोक उत्तरेला बुर सैद शहराजवळ आहे, तर दक्षिणेकडील टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ आहे.
सुएझ कालव्यामुळे युरोप आणि आशिया या दोन खंडांमधील सागरी वाहतूक कमी वेळेत वेगाने करणं शक्य झालं. सुएझ कालवा सुरु होण्याआधी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला जवळपास ७००० किलोमीटर लांब वळसा घालून जावं लागायचं. मात्र, हा कालवा झाल्याने हे ७००० किमी अंतर कमी होऊन १९३.३ किमी झालं.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर एअर इंडिया कंपनी बंद करावी लागेल
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
