लातूर : भाजपा नेते व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मांजरा धरणाला इतके पाणी का सोडले याची चौकशी झाली पाहिजे असे यावेळी फडणवीस म्हणाले.
लातूर जिल्ह्यातील भुसणी या गावातील शेती शिवाराची देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. मांजरा धरणक्षेत्रात आलेल्या महापूरामुळे मोठ्याप्रमाणावर शेती खरडून गेली तसेच अनेक शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी तक्रार यावेळी शेतकऱ्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असे अश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
फडणवीस यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री सोडा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नुकसानीचा पाहणी दौरा केला नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दौरा केला पाहिजे. हे सरकार विदर्भ मराठवाडा विरोधी सरकार आहे. पीकविमा सरकारची जबाबदारी आहे. कंपनीवर दबाव वाढवत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे असेही फडणवीस म्हणाले.
लातूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश आहे. तो सरकारने समजून घ्यावा. सरकार जर तातडीने मदत करणार नसेल तर आमचे एक आमदार कोर्टात गेले आहेत. आम्हाला अंगावर तर जावेच लागेल ना, असा इशाराही फडणवीसांनी यावेळी आघाडी सरकारला दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’
- ‘..ही तानाशाही आहे काय?’ ‘त्या’ घटनेवरून कॉंग्रेसचा संताप
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप


