मुंबई- नवी मुंबई महानगरपालिका नवीन मतदार नोंदणी बनवण्याचं काम अशा पद्धतीने झालं आहे की, त्याच्यावर एक सिनेमा बनेल. केवळ भारतीय जनता पक्षाने 20,000 हरकती नोंदवल्या असून त्यावर सुनावणी घ्या अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.
कोरोनाचे कारण देत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या निवडणूका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला काल सरकारने विधानसभेची परवानगी घेतली. त्याला विरोध करताना आमदार आशिष शेलार यांनी कोरोना आणि मान्सून पूर्व तयारीची कामांमध्ये लोकप्रतिनिधींनींंचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासकाला किती काळ अमर्याद अधिकार द्यायचे हे पण ठरवावे लागेल, असा सवाल त्यांनी केला.
नवी मुंबईतील मतदार यादीत प्रचंड घोळ असून 20 हजार हरकती भाजपाने नोंदवल्या आहेत. त्याबाबत तातडीने सुनावणी घ्या. प्रत्येक केसची सुनावणी घ्या अशी आग्रही मागणी त्यांनी केल्या. ज्यावेळी सरकार निवडणूका पुढे ढकलण्याची परवानगी मागते आहे तेव्हा, एका वाक्यात सांगा झाला तर अमर्याद अधिकार राज्य सरकारकडे येण्याच्या या निर्णयाला भाजपाचा विरोध आहे. असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- भाजप-मनसे युती होणार ?, गिरीश महाजन यांची मोठी प्रतिक्रिया
- माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे.
- मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालातून महत्वाची माहिती उघड
- अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड
- नितळ त्वचेसाठी घ्या ‘या’ रसांचा आस्वाद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

