मुंबई : सीबीएसई पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(HSC) बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते.
मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नव्हता. अखेर आज बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केला आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा होणार नाहीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. या निर्णयामुळे संभ्रम अवस्थेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती व तिसऱ्या लाटेची शक्यता आणि लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सीबीएसईसह राज्य बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द कराव्यात अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली होती. दरम्यान, गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने राज्यातील बोर्डांच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “आज मुंडे साहेब असते तर मराठा समाजावर हा अन्याय झाला नसता”- पंकजा मुंडे
- ‘या’ गोलंदाजाला बघुन उडाली वॉर्नरची झोप
- इराणच्या नौसेनेला तगडा झटका; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली
- ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’; किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ वादग्रस्त ट्विटवर मनसेची टीका
- दहावीच्या परीक्षा रद्दच ! उच्च न्यायालयातील ‘ती’ याचिका अखेर मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

