पुणे : कोरोना रोगामुळे देशातील शैक्षणिक क्षेत्रास देखील मोठा फटका बसला आहे. यामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलं आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) बारावीच्या लेखी परीक्षा या साधारणतः फेब्रुवारी-मार्च दरम्यान होत असतात. मात्र, कोरोना काळामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये नियमित वर्ग न झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यास अडचणींचा सामना करावा लागला आहे.
यामुळेच, या परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांबाबत आता विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. बारावीच्या परीक्षांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) ३ एप्रिलपासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत बोर्डाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार २३ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परिक्षेचे हॉल तिकीट दिनांक ३ एप्रिल शनिवार पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शाळा/महाविद्यालयांना त्यांच्या लॉग-इन मधून हे हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. याची प्रिंट महाविद्यालय देणार असून त्यावर मुख्यध्यापक, प्राचार्य यांची सही-शिक्का विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे.
दुरुस्ती असल्यास काय करावे ?
ज्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये विषय, नाव, फोटो व इतर गोष्टींची दुरुस्ती असल्यास महाविद्यालयांनी त्या आपल्या पातळीवर करून त्वरित त्याची कॉपी विभागीय मंडळाला द्यायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खंडणीखोर सरकारला महिलांच्या सुरक्षिततेची काळजी नाही; भाजप नेत्याचा घणाघात
- ‘पवार साहेब मला आपला मुलगाच मानतात, गुन्हा दाखल होणार नाही’
- महाराष्ट्रासाठी खुशखबर! नितीन गडकरींची मोठी घोषणा
- सर्वसामान्यांना अडचणीत टाकणारी कोणतीही भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर
- लॉकडाऊनबाबत तूर्तास निर्णय नाही, मात्र… राजेश टोपेंनी केलं सूचक भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

