Share

महाराष्ट्रासाठीचा प्राणवायू रोखणाऱ्या कर्नाटकच्या भाजप सरकारला लाज कशी वाटत नाही ?

Published On: 

कोल्हापूर : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अधिकचा ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे इतर राज्यातून ऑक्सिजनची मदत मिळत आहे. राज्य सरकारने देखील ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, अशातच कानडी सरकारने महाराष्ट्राचा प्राणवायू पुरवठा रोखला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमका काय प्रकार ?

आज कर्नाटक सरकारने अचानकपणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजन पुरवठा रोखला आहे केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला आहे. कर्नाटकच्या बेल्लारीमधून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरु होता. पण कर्नाटक सरकारने तो आज बंद केला आहे. सांगली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन आणणारा टँकर रिकामा परतला आहे. अचानकपणे ऑक्सिजन पुरवठा थांबल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!