जळगाव : पश्चिम बंगालमध्ये ३८ टक्के मते भाजपच्या पारड्यात टाकली. पूर्वी तीन आमदार होते. आता ७५ आमदार झाले. निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये अराजकता माजलेली आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण होतेय. त्यांची घरे जाळली जात आहेत. तृणमुल काँग्रेसच्या धुडगुसामुळे कायदा व सुव्यवस्था कोडमललेली आहे असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलाय.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निषेध व्यक्त केल्यानंतर भाजपतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी महाजन यांनी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे उपस्थित होते.
पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना टार्गेट करणे सुरू केले. कार्यालये पेटवून दिली, असा आरोप करत भाजपने आंदोलनाची हाक दिली होती. यावल, रावेर, फैजपूर, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, जामनेर आदी ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तृणमूलचा निषेध केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. सुरुवातीपासून तिन्ही पक्षांमध्ये मराठा आरक्षणाबाबत एकवाक्यता नव्हती. तिन्ही पक्ष भांडत होते. नेते वेगवेगळी मते मांडत होती. हे आरक्षण व्हावे असे सरकारमधील मंत्र्यांना वाटत नव्हते. नियोजनाचा व समन्वयाचा अभाव होता. तिन्ही पक्षांच्या विसंगतीमुळे हे आरक्षण टिकवण्यात सरकार अपयशी ठरले असा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सोलापूरकरांचा नाद खुळा! तीन लाखांचा दंड भरू पण, मास्क लावणार नाही
- इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढल्या, आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाकडून नोटीस
- ‘कर्ज फेडण्यासाठी छोट्या कर्जदारांना जास्त वेळ द्या’, आरबीआयचे बँकांना निर्देश
- ‘कोरोना लढ्यासाठी विदेशातून आलेल्या निधीचे काय झाले?’, राहुल गांधींचा मोदींना सवाल
- सुत्रे हाती घेताच ममतांकडून बंगालमध्ये कठोर निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
