Share

आठवड्यातून एकदा नमाज अदा करणं कुणाच्या भावना कसं दुखावू शकतं-असदुद्दीन ओवैसी

Published On: 

गुरुग्राम : गुरुग्राममध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी नमाजावरून वाद सुरू आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १२ मध्ये नियमितरुपात होत असलेला जुम्याचा नमाज बंद करून याच जागेवर गोवर्धन पूजा करण्यात आली. आता यावरूनच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इथं होणाऱ्या नमाजावर आक्षेप घेतला होता.

दरम्यान शुक्रवारी गुरुग्रामच्या सेक्टर १२ मधल्या पार्कात गोवर्धन पूजेचं आयोजन करून जुम्याच्या नमाजावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत नमाज बंद करायला भाग पाडलं. यावरच करायला भाग पाडलं होतं. यावरच असदुद्दीन ओवैसी यांनी आंदोलनकर्ते किती कट्टरतावादी झालेत, हे गुरुग्राममध्ये शुक्रवारी नमाजाला विरोधाचं उदाहरण आहे. हा मुस्लिमांप्रती स्पष्ट द्वेष आहे. आठवड्यातून एकदा १५-२० मिनिटांसाठी जुम्याचा नमाज अदा करणं कुणाच्या भावना कसं दुखावू शकतं? असा सवाल करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान गोवर्धन पूजेच्या वेळी या ठिकाणी मोठ्या संख्येत पोलीस दल तैनात करण्यात आले होते. या पूजेत भाजप नेते कपिल मिश्रादेखील सहभागी झाले होते. ‘रस्ते धार्मिक कार्यक्रमांसाठी नसतात’ असं वक्तव्य यावेळी कपिल मिश्रांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!