औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी विविध पद्धतीने आंदोलन सुरू आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलक आंदोलन करत असताना त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहे. त्यातील सौम्य स्वरूपाचे गुन्हे मागे घेणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरक्षणासाठी मराठा समाज आग्रही आहे सरकार दरबारी अनेक मोर्चे धरणे असे विविध स्वरूपाची आंदोलने गेल्या काही वर्षापासून मराठा समाज करीत आहे. त्यातच 2014 ते 2019 या युती सरकारच्या काळातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे देखील मागे घेण्यात येणार आहे.
मात्र आंदोलनादरम्यान दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घेण्यात येणार नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्याबरोबरच यात मालमत्तेचे नुकसान, सरकारी कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांच्यावरील हल्ले यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात येणार नाही असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात बार्टीचे मोफत क्लासेस सुरू करण्याचे धनजंय मुंडे यांचे निर्देश
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- ‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’; ‘त्या’ ठाकरेंच्या उपस्थितीवर वरुण सरदेसाईंनी डागली तोफ
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- ‘रामायण काल्पनिक असल्याचा दावा करणाऱ्या पक्षाच्या लोकांना हिशोब मागण्याचा हक्क नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

