Share

‘पेगासस प्रकरणी गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा’, राहुल गांधींची मागणी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून भारतातल्या ४० पेक्षा अधिक लोकांवर पाळत ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हेरगिरीच्या प्रकरणाने देशात एकच खळबळ उडवून दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर उघडकीस आलेल्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून मोदी सरकारला विरोधकांनी चांगलंच घेरलंय.

शुक्रवारी संसद परिसरात काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही आपला फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला आहे. हा केवळ आपल्या खासगी आयुष्याच प्रश्न नाही तर हे जनतेच्या आवाजावर आक्रमण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

इस्रायलने दहशतवाद्यांविरूद्ध वापरण्यासाठी वर्गीकृत केलेले पेगासस हे एक शस्त्र आहे. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्याविरूद्ध याचा वापर एक राजकीय शस्त्र म्हणून केला, त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहीजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी करत राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी संसद परिसरात आंदोलनही केलं. यावेळी, काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाळ, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी तसंच काँग्रेसचे अनेक खासदार उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!